रक्षा विसर्जन पाण्यात न करता वृक्षारोपणासाठी वापर करत भोसले कुटुंबीयांनी जपला आधुनिक विचार
महाळुंगे : वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक दत्तात्रय काका भोसले (वय ८६) यांचे आकस्मिक निधन झाले आज त्यांचा सावडण्याचा अर्थात अस्ति विसर्जन कार्यक्रम झाला यावेळी राख व अस्ती पाण्यात विसर्जित न करता शेतातच खड्डे करून त्यात राख टाकण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आले. यामाध्यमातून पारंपरिक पद्धतीला फाटा देणाऱ्या भोसले कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंत्यविधीची रक्षा नदीपात्रात विसर्जन करण्याची परंपरा थांबवणे कठीण आहे. कारण ही रुढी भावनिक आहे. नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी नदीपात्रात रक्षा विसर्जन न करण्याचा निर्णय भोसले कुटुंबीयांनी घेतला आणि आपल्या वडिलांच्या अंत्यविधीनंतरची रक्षा नदीत विसर्जिन न करता ती झाडांना वापरून वडिलांच्या स्फूर्ती जपल्या आहेत.
महाळुंगे (ता. खेड) माजी उपसरपंच गणेश भोसले उद्योजक संतोष भोसले यांनी त्यांचे वडील हभप दत्तात्रय काका भोसले यांच्या अंत्यविधीनंतर वडिलांच्या स्मृती जतन करण्यासाठी रक्षा नदीपात्रात विसर्जित न करता शेतात आंबा वड, पिंपळ, आदी देशी वृक्षांचे वृक्षारोपण केले आहे.
परिसरात ते काका नावाने परिचित होते. दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी पालखी सोहळ्याचे प्रमुख पद भूषवले व तितक्याच जबाबदारी पार पाडले वारकऱ्यांची सेवेकर्यांची मनापासून सेवा केली. आळंदी, देहू, पंढरपूर चे नित्याचे वारकरी होते. त्यांनी सामाजिक अध्यात्मिक व राजकिय क्षेत्रात काम केले. त्यांनी तरुण मुलांना आपल्या सप्त गुणानं वाव मिळावा तसेच मुलांचे संघटन असावे याकरिता श्रीपती बाबा महाराज नाट्य क्रीडा मंडळाची स्थापना १९६२ साली केली.
बाबा महाराजांचे निष्ठावंत वारकरी पालखी प्रमुख कौटुंबिक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शेती, विमा क्षेत्रात आपले नाव अजरामर करणारे, माणुसकीचा झरा लहान मोठ्यांना मायेची पाखरं घालून विचारपूस करुन कायम पाठिवर प्रेमाची थाप टाकणारे उत्तुंग व्यक्तिमत्व, कर्तुत्व दातृत्व मातृत्वाची मुर्ती, मोठे आणि थोरपणाची व्याख्या त्यांच्याकडे पाहून समजावी असे मार्गदर्शक, मितभाषी, सुस्वभावी आंनदी सर्व कुटुंबीयांचे नव्हे तर पंचक्रोशीतील आधारस्तंभ सर्वांचे काका माणुसकीच्या दुनियेतील राजामाणुस, आधारवड, सावली अनंतात विलीन झाले. त्यांच्या निधनाने फार मोठी सामाजिक हानी झाली आहे. असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले, परिसरात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपल्या प्रियजणांचे अस्थी किंवा रक्षा विसर्जन करताना आपण अतिशय संवेदनशील असतो. प्रिय जणांच्या अस्थी विसर्जीत करताना शक्यतो नदीपात्रात व अथवा वाहत्या पाण्यात करतो. हे करण्यामागे आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजणांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी हा सारा प्रपंच असतो. मात्र याला अपवाद भोसले कुटुंब ठरले आहे. झाडांच्या रूपाने सदैव काकांच्या स्मृती आपल्या समोर राहणार आहेत. हाच आर्दश इतरांनी घ्यावा असे गावातील जाणकार व पाहुणे रावळ्यांनी मत व्यक्त केले आहे.
मृतकावर अंत्यसंस्कार केल्यानंतर लाकडाची होणारी राख आणि अस्ती नदीच्या वाहत्या पाण्यात टाकण्याची परंपरा पूर्वापार पासून चालत आलेली आहे; मात्र रुढी, परंपरेला फाटा देत भोसले कुटुंबीयांनी व सर्व पाहुणे मंडळीनी राख व अस्तींचे विसर्जन पाण्यात करण्याऐवजी शेतातच खड्डे करून त्यात ते टाकून वृक्षारोपण करण्याची इच्छा उपस्थितांसमोर व्यक्त केली. त्यास सर्वांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वांसमक्ष हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विनायक तुपे, अखिल भारतीय वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख विनोद महाळुंगकर, उद्योगपती मधुकर सातव, माजी उपसरपंच विशाल भोसले, माजी उपसरपंच देविदास वाळके, गणपत भोसले, शंकर महाळुंगकर, बाप्पू पाचरणे, स्वप्निल शेटे, अनिल गायकवाड, राजेंद्र भोसले, सदाशिव शेटे, अशोक कडलक, दत्तात्रय कडलक, गुलाबराव वाघोले, अशोक येळवंडे, रामदास भोसले, अरुण भोसले, जालिंदर भोसले, राजु भोसले, आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.