नारायण मेघाजी लोखंडे यांना पुण्यतिथीनिमित्त कनेरसर येथे अभिवादन.
सत्यविचार न्युज:
राजगुरूनगर (प्रतिनिधी):
भारतीय कामगार चळवळीचे जनक, रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कनेरसर ता.खेड या त्यांच्या मुळ गावी कनेरसर ग्रामपंचायत व नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून कवी-लेखक अशोकराव टाव्हरे, दादाभाऊ गावडे उपस्थित होते.अध्यक्षस्थानी कनेरसरच्या सरपंच सुनीताताई केदारी होत्या.लोखंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब लोखंडे यांनी सर्वांचे स्वागत केले.
अशोकराव टाव्हरे यांनी रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी ब्रिटिश काळात कामगार हितासाठी दिलेल्या लढ्यांचे महत्व विशद केले.रविवारची सुट्टी व आठ तास ड्युटी या कामगारांसाठी मुलभूत सुविधा त्यांच्या संघर्षामुळे मिळाल्या असे नमुद करून नारायण मेघाजी लोखंडे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी कनेरसर ग्रामस्थांनी चळवळ उभारली पाहिजे असे आवाहन केले.
साहित्यिक दादाभाऊ गावडे यांनी नारायण मेघाजी लोखंडे हे कनेरसर गावाने देशाला दिलेले थोर रत्न असून त्यांच्या कार्य आधुनिक काळातही प्रेरणादायी आहे असे विचार मांडले.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाबाजी लोखंडे यांनी आभार मानले.यावेळी खेड ता.भाजपचे उपाध्यक्ष दिलीपराव माशेरे,समाजसेवक बाबा हजारे,कनेरसर सोसायटी चेअरमन बाळासाहेब खरपुडे.ॲड.विवेक पवार,ॲड.सुहास दौंडकर, जयप्रकाश दौंडकर, कनेरसर ग्रां.प.सदस्य उमेश दौंडकर, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश माशेरे,खेड पो.स्टेशनचे विशाल कोठावळे,सुरेश गावडे व ग्रामस्थ उपस्थित होतो.
कनेरसर येथे दि.१५ फेब्रुवारी रोजी होत असलेले विश्वसाहित्यिक, पद्मश्री नामदेवराव ढसाळ साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी मत व्यक्त केले.