आपत्ती व्यवस्थापन जागरूकता काळाची गरज – साहेबराव जाधव,
चाकण : प्रतिनिधी
आपत्ती व्यवस्थापन जागरूकता ही काळाची गरज असून, धोक्याच्या वेळी प्रसंगावधान राखणे आवश्यक असल्याचे विचार योद्धा माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव जाधव यांनी व्यक्त केले.
खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आपत्ती व्यवस्थापन जागृती कार्यक्रमात जाधव बोलत होते. यावेळी माजी सैनिक ऋषिकेश आरुडे यांनी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना आपत्तीच्या वेळी येणाऱ्या संकटाना कसे सामोरे गेले पाहिजे. या विषयी मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाला संतोष ढवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, कुमार गायकवाड आदिंसह शिक्षक वृंद सहभागी झाले होते.
आपत्ती व्यवस्थापन आणि जागरूकता कार्यक्रमांमध्ये साहेबराव जाधव यांनी विद्यार्थी व शिक्षकांना पूरग्रस्त परिस्थिती असेल किंवा भूकंप परिस्थितीच्या वेळी काय सावधानता बाळगावी, याविषयी माहिती दिली. तसेच इमर्जन्सी मध्ये मदत कशी घ्यावी, सीपीआर कसा द्यावा, फायर फायटिंगचे देखील प्रशिक्षण देण्यात आले. विविध शाळा आणि संस्थांमध्ये फायर फायटिंगचे इक्विपमेंट अग्निशामक यंत्र बसवलेले असतात परंतु अनेकांना हे यंत्र कसे हाताळावे याची माहिती नसते म्हणून अग्निशामक यंत्रांचा वापर कसा करावा याचे देखील प्रशिक्षण देण्यात आले.
वीस वर्षे किंवा त्याहूनही जास्त सीमेवर सेवा केल्यानंतरही जीवन असेपर्यंत देशसेवा करण्याची हिम्मत ही सैनिकात असते, याचे उत्तम उदाहरण या कार्यक्रमातून पहावयास मिळाले.