पोदार स्कुल मध्ये अभिनव उपक्रम नवकल्पनात्मतक पर्यावरण जनजागृती.
सत्यविचार न्यूज :
माणसाच्या प्रगतीचा वेग क्षणाक्षणाला वाढताना दिसत आहे. विशेषत: महानगरातील लोकसंख्येला आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आवश्यक त्याठिकाणी नैसर्गिक संसाधनांचा वापर करणेही अनिवार्य ठरत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निसर्गाचा समतोल साधून प्रगती करणे हे मोठे आव्हान ठरत चालले आहे.
त्यामुळेच दैनंदिन जीवन जगताना आणि वेगाने प्रगती साधताना पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता पर्यावरणाचे संतुलन राखणे काळाची गरज बनली आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन पोदार स्कुल च्या माध्यमातून पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी नवकल्पनात्मक पर्यावरण जनजागृती या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चाकण येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी नवकल्पनात्मक पर्यावरण जनजागृती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्रीन कायझेन आणि पोदार इंटरनॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबवत येत आहे
पोदार इंटरनॅशनल स्कूल, चाकण यांनी ग्रीन कायझेन नेटवर्कच्या सहयोगाने विद्यार्थ्यांसाठी नवकल्पनात्मक पर्यावरण जनजागृती आणि सहभागिता कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत, १) पर्यावरणीय मुद्द्यांविषयी अज्ञान किंवा अनभिज्ञता दूर करणे. २) पर्यावरणीय चिंतेबद्दल जागरूकता वाढवणे. ३) विद्यार्थ्यांना समस्या विश्लेषणात सहभागी करणे आणि उपाय शोधणे. ४) साध्य आणि मोजता येणारे परिणामांसाठी क्रियान्वयन करणे. ५) या क्रिया दैनंदिन क्रियाकलापांमध्ये समाविष्ट करणे.
ह्या कार्यक्रमाची सुरुवात उन्हाळ्याच्या सुट्टीत करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांना शाश्वततेसाठी खेळ संच देण्यात आले. या संचामध्ये पर्यावरणीय चिंतेबद्दल माहिती देणारे पुस्तक, विविध क्रियाकलाप संच आणि दोन हजार पेक्षा अधिक ग्रीन क्विझ प्रश्नांचा समावेश आहे. ग्रीन कायझेन नेटवर्क ८ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी ग्रीन क्विझ स्पर्धा आयोजित करणार आहे, या स्पर्धेत सहभागी व विजयी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.
या उपक्रमाला अत्यंत यशस्वी बनवण्यासाठी, उपप्राचार्या गोमती आणि पालक शिक्षक संघटनेतील निलेश पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहे.
चाकण येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल च्या प्राचार्या सिमरन कौर म्हणाल्या, “या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणीय चिंतेची समज वाढली आहे आणि ग्रीन क्विझच्या माध्यमातून त्यांचे ज्ञान वृद्धिंगत झाले आहे. पालकांनी या नवकल्पनात्मक उपक्रमाचे कौतुक केले आहे, ज्यामुळे मुलांवर पर्यावरणीय जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही जागरूकता आणि सहभाग यातील अंतर कमी करू आणि विद्यार्थ्यांना परिणामकारक सहभागाकडे नेऊ, ज्यामुळे दृश्य परिणाम दिसतील.”