Lok Sabha Election: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात ;राज्यात 8 तर देशात 88 मतदारसंघात होणार मतदान
सत्यविचार न्यूज :
देशभरात आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच मतदान होत आहे. राज्यात 8 तर(Lok Sabha Election) देशात 88 मतदारसंघात मतदान होत आहे.
राज्यात आज विदर्भातील यवतमाळ,बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, या ठिकाणी तर मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी या मतदारसंघात मतदान होत आहे.
लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.मतदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणा यासाठी सज्ज आहेत.
दुसरीकडे अवघ्या देशाचं लक्ष असलेल्या केरळ मधील वायनाड मतदारसंघात आज मतदान होत आहे.राहुल गांधींविरोधात वायनाडमध्ये भाजपचे के. सुरेंद्रन आणि सीपीआयच्या अॅनी राजा या निवडणूक लढवत आहेत.
दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20जागा, कर्नाटकातील 14 जागा, राजस्थानमधील 13 जागा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 8जागा, मध्य प्रदेशातील 6 जागा,
आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3 जागाआणि जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरामधील 1 जागेचा समावेश आहे. याशिवाय मणिपूरची 1 सीट आहे.