महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरनाच्या पाईपलाईचे ठेकेदाराकडून अर्धवट काम, खराबवाडीतील अथर्व हॉटेलच्या समोर गटार गंगा…!
सत्यविचार न्युज : खराबवाडी गावात महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनच्या कामाच्या संदर्भात ठेकेदाराने अक्षरशः उच्छाद माजवला आहे. खराबवाडी गावातील अथर्व हॉटेलच्या समोर अक्षरशः पंधरा दिवस होऊन गेले तरी अजून पाईपलाईनचे काम पूर्ण न केल्याने अक्षरशः हॉटेलच्या समोर गटार गंगा वाहू लागली आहे. पण उमेश मोरे नामक ठेकेदार अक्षरशः मुगरूर भाषा वापरून किती बातम्या लावा मला काही फरक पडत नाही अशी बतावणी करत आहे.
महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरनाच्या पाईपलाईनचे काम तुमच्यासाठी आहे तुम्हाला थांबावे लागेल. अशी भाषा वापरून काम करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे अक्षरशः अथर्व हॉटेल समोर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठेकेदार एवढा मुगरूर आहे त्याने खराबवाडी गावात जेवढे काम केले आहे त्याठिकाणी कुठे खड्डे बुजवले नाहीत तर, काही ठिकाणी नीट बुजवलेलेही नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण ठेकेदार रुबाबात अशा कामांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तीचे नावे सांगून कामात चाल ढकल करून हा ठेकेदार सर्व सामान्य नागरिकांवर रुबाब करत असल्याचे समोर आले आहे. जर ठेकेदाराने या पाईपलाईचे काम योग्य व वेळेत केले नाही तर, त्याचे काम होऊन देणार नसल्याचे खराबवाडी गावातील उद्योजक संतोष खराबी यांनी सांगितले. यावर आता तरी ठेकेदाराचे डोळे उघडणार की ठेकेदार असाच मनमानी कारभार करणार हेच पहावे लागेल.